ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजपचे नेते आणि लोकसभेचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. उत्तर प्रदेशामध्ये स्पर्धा परीक्षांच्या निकालांना होणारा विलंब, परीक्षेपूर्वी होणारी पेपरफुटी यासारख्या प्रकरणांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावरुन आता पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीका केली आहे.
वरूण गांधी यांनी ट्विट केले की, ‘आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो. रेल्वे ग्रुप डीचे 1.25 कोटी तरुण दोन वर्षांपासून निकालाची वाट पाहत आहेत. लष्करातील भरतीबाबतही असेच आहे. भारतातील तरुणांनी कधीपर्यंत धीर धरायचा?’ असा प्रश्न करत वरुण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.