मार्च-एप्रिलमधील आकडेवारी सादर : अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोविड19च्या संकटामुळे विविध प्ररकारचे व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. तर फक्त अत्यावश्यक क्षेत्रांतील क्यवहार काही प्रमाणात सुरु ठेवण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून बँकिंग क्षेत्राचा कारभार सध्या सुरु आहेत. या लॉकडाऊच्या कालावधीत मार्च आणि एप्रिल या कालावधीत 5.66 लाख कोटी रुपयाची सरकारी बँकांनी कर्ज मंजुर केली आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ट्विटकरुन दिली आहे.
सध्या देशात तिसऱया टप्पयातील लॉकडाऊन सुरु आहे. याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर या कर्जाचे वाटप वेगाने करण्यात येणार असून यातून आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी भर देण्यात येणार आहे. मार्च व एप्रिल या कालावधीत सरकारी बँकांनी 41.81 लाखांपेक्षा अधिक खात्यांसाठी 5.66 लाख कोटी रुपयाचे कर्ज देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
सरकारी बँकांनी कर्ज भरण्याच्या हप्त्यांमध्ये दिलेल्या सवलतीचा लाभ ग्राहकांना दिला आहे. यात तीन महिन्यांसाठी ग्राहकांना कर्ज फेडण्यासाठी सवलत मिळणार आहे. हा लाभ घेणाऱयांमध्ये जवळपास 3.2 कोटीपेक्षा अधिक खातेदारांचा यात समावेश होणार आहे. यामुळे ग्राहकांची चिंता काही प्रमाणात टळण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडक क्षेत्रांतील कर्जदार
सदर कर्ज घेणाऱयांमध्ये प्रामुख्याने एमएसई, किरकोळ कर्जदार, शेती आणि व्यावसायिक क्षेत्रातील कर्जदारांचा समावेश असल्याची माहिती यावेळी दिली आहे.