प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री जन कल्याण प्रचार-प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. बेळगावमध्येही सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी जिल्हास्तरीय कमिटीची स्थापना करण्यात आली असून कार्यकारिणीच्या सदस्यांना दिल्ली येथील कर्नाटक राज्याचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले, केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. परंतु त्यांची माहिती सर्वसामान्यांना होत नसल्यामुळे त्यांना या योजनांचा फायदा होत नाही. यासाठी प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार-प्रसार अभियान राबविले जात आहे. बेळगावमधील उद्योजकांना घेऊन एक कमिटी बनविण्यात आली असून त्यांच्याद्वारे योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कमिटीच्या अध्यक्षपदी उद्योजक विलास बदामी, जनरल सेपेटरी गणपती, शिवानंद हिरेमठ, रमेश देशपांडे, वाणी रामचंदानी, वीणा जोशी, प्रकाश हिरेमठ, सतीश जाधव, विजय चप्पर, मेघना, रेणुका यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.