माजी आमदार नितीन शिंदेंचा सवाल, मिरजेत एसटी कर्मचाऱ्यांचे दुखवटा आंदोलन
प्रतिनिधी / मिरज
एसटी महामंडळाच्या विलीनीकरण लढय़ाला आज 110 दिवस होऊनही राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. ठोस निर्णयाविना लांबत चाललेल्या या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची बनली असून, राज्यभरातील एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. निर्णयाविना एसटी कर्मचाऱ्याचे आंदोलन लोंबकळत ठेवणारे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अजून किती एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेणार? असा संतप्त सवाल माजी आमदार नितीन शिंदे यांनी केला.
शासनात विलीकरणाच्या मागणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ एसटी कर्मचारी संप आंदोलन करीत आहेत. आंदोलन काळात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱयांना श्रध्दांजली वाहून शासनाचा निषेध करण्यासाठी शनिवारी मिरज स्थानकाच्या बाहेर दुखवटा आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मयत एसटी कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहताना नितीन शिंदे बोलत होते.