प्रतिनिधी / सोलापूर
टाळेबंदीच्या कालावधीत देशातील 2 कोटी संघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचारी आपली रोजीरोटी गमावले, असंघटीत क्षेत्रातील कोट्यवधी कामगार भिकेला लागले, नवीन शैक्षणिक धोरण तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी- पालक गोंधळून गेले. टीचभर पोट भरू न शकणाऱ्या पदवी घेतलेले कोट्यवधी तरुण नोकरी साठी टाहो फोडत असताना केंद्र आणि राज्य सरकला याची जाणीव होऊन ही जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे याची जनतेत चीड निर्माण झाली पाहिजे. कामगार कायद्यातील प्रतिगामी बदला विरुद्ध कामगार संघटनांनी पुकारलेले हे युद्ध आहे. 26 नोव्हेंबरच्या करो या मरोच्या लढाईत वज्रनिर्धाराने,ताकदीने सहभागी व्हा असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम ( मास्तर ) सर्वसाधारण सभेत बोलताना केले.
केंद्रीय कामगार संघटना संयुक्त समितीच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी संघटीत असंघटीत कामगार कर्मचारी यांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या आणि कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने त्याच्या तयारी करीता रविवार दिनांक 22 नोव्हेंबर 20 रोजी सांय 5 वाजता माकपचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे माकपचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.युसुफ शेख (मेजर) यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण सभा पार पडली.
ते बोलताना पुढे म्हणाले की, 26 नोव्हेंबरला कितीही पोलीस प्रशासनाची दडपशाही त्याला झुगारून द्या पण सरकार शी दोन हातच कराच.कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ताच जनतेसाठी लाठ्या काठ्या गोळ्या झेलू शकतो हा आजवरचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती 26 नोव्हेंबर संविधान दिन रोजी शपथ घ्या.
यावेळी व्यासपीठावर अॅड एम.एच.शेख, सिद्धपा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी,नसीमा शेख,कुरमय्या म्हेत्रे, सुनंदा बल्ला,हानिफ सातखेड, प्रा.अब्राहम कुमार, रंगप्पा मरेड्डी,अनिल वासम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.अनिल वासम यांनी केले. आदी विविध आघाडी वरील प्रतिनिधींनी संप यशस्वी होण्यासाठी योगदान बाबत मनोगत व्यक्त केले.