सरपंच कोण होणार याकडे नजरा
प्रतिनिधी
सातारा
नुकत्याच पार पडलेल्या जिह्यातील 876 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतमध्ये गुलाल अंगावर घेऊन अनेक जण आपणच सरपंच होणार याची स्वप्ने पहात आहेत. सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे नजरा होत्या. आता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातुन उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. 29 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
सातारा जिह्यातील 876 ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम पार पडला आहे. दि.18रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. निवडून आलेल्या सदस्यांना आपलाच कसा सरपंच बनवता येईल याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.आज सायंकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि.29रोजी सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हय़ातील जिह्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी 81, खुला 73, अनुसूचित जमाती महिलांसाठी 6,खुला 6,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 205, खुला 199, सर्वसाधारण महिला 463, खुला 460 असे आहे. हा आरक्षणाचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते 31मार्च 2025 असा राहील. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. 29 रोजी कोरोनाचे नियम पाळून तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.त्यामुळे सरपंच कोण होईल ते दि. 29 रोजी आरक्षण सोडत झाल्यानंतर समजणार आहे.