शिरोळ/प्रतिनिधी
सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी तालुका कर्जमाफी संघर्ष समितीने शिरोळ तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला बहुसंख्य गावातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत प्रतिसाद दिला. यामुळे शिरोळ तालुकयात सगळीकडे शांतता पसरली होती.
आज सकाळी दहा वाजता शिवाजी चौकात एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास पृथ्वीराज यादव, पंडित काळे, दादा कोळी, गजानन संकपाळ, धनाजी पाटील नदेकर, शहाजी गावडे, बंटी देसाई, अरविंद माने, बजरंग काळे, पिंटू फल्ले, इमरान आत्तार यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.
महाराष्ट्र राज्य शासनाने दोन लाख रुपयांची थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांचा बहुसंख्य शेतकऱ्यांना याचा लाभ होणार नाही. शिरोळ तालुक्यात नुकतेच महापुराने व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर हा न्याय आहे. यामुळे किमान दोन लाख रुपये पर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शिरोळ तालुका कर्जमाफी संघर्ष समितीचे प्रमुख पृथ्वीराज यादव, सुनील संकपाळ यांनी शिरोळ तालुका बंदची हाक दिली होती. त्यास प्रतिसादही मिळाला आहे.