वृत्तसंस्था/ मुंबई
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील येथे सुरू असलेल्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर सर्फराज खानच्या नाबाद शतकाने मुंबईचा डाव सावरला. या सामन्यात उत्तरप्रदेशने आपला पहिला डाव 8 बाद 625 धावांवर घोषित केला होता.
उत्तरप्रदेशच्या पहिल्या डावात उपेंद्र यादवने शानदार नाबाद द्विशतक (203) झळकविले. मुंबईने 2 बाद 20 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. सिद्देश लाडने 174 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 98 तर सर्फराज खान 4 षटकार आणि 14 चौकारांसह 160 चेंडूत 132 धावांवर खेळत आहे. भुपेन लालवाणीने 80 चेंडूत 7 चौकारांसह 43 तर हार्दिक तेमोरेने 94 चेंडूत 10 चौकारांसह 51 धावा जमविल्या. लाड आणि सर्फराज खान यांनी पाचव्या गडय़ासाठी 210 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी मुंबई स्थिती 4 बाद 243 अशी होती. सर्फराज खानने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपले दुसरे शतक 107 चेडूत पूर्ण केले. लाडचे नववे शतक केवळ दोन धावांनी हुकले मुंबईने दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 353 धावा जमविल्या असून ते अद्याप 272 धावांनी पिछाडीवर आहेत. हा सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकला आहे. मात्र उत्तरप्रदेशचा संघ पहिल्या डावात मुंबईवर आघाडी मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक
उत्तरप्रदेश प. डाव 8 बाद 625 डाव घोषित (उपेंद्र यादव नाबाद 203), मुंबई प. डाव- 5 बाद 353 (सर्फराज खान खेळत आहे. 132, लाड 98, अंकित रजपूत 3-63).
धर्मशाला- हिमाचल प्रदेश प. डाव- 496, बडोदा प. डाव- 2 बाद 15
इंदोर- सौराष्ट्र प.डाव 344, मध्यप्रदेश प. डाव- 280, सौराष्ट्र दु. डाव 2 बाद 165.