नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेत सुरळीत कामकाज सुरू व्हावे यासाठी सरकारने बुधवारी सायंकाळी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आमंत्रित केली होती. अधिवेशनात मांडण्यात येणाऱया महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी गेंधळाला फाटा देण्यात यावा अशी अपेक्षा सरकारच्यावतीने बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली. या बैठकीमध्ये सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एम.एस. व्ही. मुरलीधर यांच्या व्यतिरिक्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, रेल्वे व वाणिज्य मंत्री पियूष गोयल, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि अर्जुनराम मेघवाल हे उपस्थित होते. तसेच काँग्रेसकडून आनंद शर्मा आणि गुलाम नबी आझाद हे विरोधी पक्षातील इतर नेते उपस्थित होते.