ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी बिहारमध्ये व्हर्च्युअल रैलीला संबोधित करताना भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे वक्तव्य केले होते. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमित शहा यांचे ते विधान ट्विटर वर शेअर करत राहुल गांधी यांनी शायरी च्या माध्यमातून त्यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, सर्वांना ‘सीमे’ वरील हकीकत माहीत आहे. पण दिल खुश ठेवण्यासाठी ‘शाह-यद’ हे विचार चांगले आहेत.
कालच्या रैलीला संबोधित करताना शहा यांनी म्हटले होते की, भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायल नंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे. यावर राहुल गांधी यांनी शायरी करत टीका केली आहे.