बेळगावच्या विविध संस्थांतर्फे पत्रकार अशोक याळगी यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
धडाडीचे पत्रकार, मनस्वी नाटय़कर्मी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनापासून झटणारे, सीमाआंदोलनात झोकून देणारे, नवनवीन सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम चालवून सर्वांशी प्रेमळ-जिव्हाळय़ाचे नाते जोडणाऱया अशोक याळगी यांचे वयाच्या 82 व्या वषी, गुरुवार दि. 10 डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगाव परिसरातील अनेक संस्था पोरक्मया झाल्या आहेत. ही सभा त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करीत आहे. अशा शब्दात अशोक याळगी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला.
लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी यांच्या निधनानंतर बेळगावच्या विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे वरेरकर नाटय़ संघ येथे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ऍड. राम आपटे होते. या सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला. या सभेस पुढीलप्रमाणे सर्वांनी आपले विचार व्यक्त केले.
मंगेश देऊळकर-मसाप शाखा बेळगाव
अशा तऱहेने याळगी जातील असे वाटले नव्हते. त्यांच्यामुळे किशोरी आमोणकर यांना तसेच अनेकांना भेटण्याची संधी मिळाली.
मनीषा सुभेदार-तरुण भारत
तरुण भारततर्फे मनीषा सुभेदार यांनी श्रद्धांजली वाहिली. कोणाला काय म्हणायचे आहे, याचे आकलन असणाऱया याळगी यांनी आपल्याला तरुण भारतमध्ये आणले आणि पत्रकारितेला सतत प्रोत्साहन दिले. अनेक पत्रकारांना त्यांनी घडविले.
निखिल नरगुंदकर-बुलक
अशोक याळगी म्हणजे अजब रसायन होते. बुलकच्या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तके उजेडात आणून अनेकांना बोलते केले.
आनंद मेणसे-भाकप-कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ
जातीय दंगलीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात याळगी आघाडीवर होते. जे पटेल ते मान्य करायचे व जे पटणार नाही, त्याविरोधात उभे रहायचे हा त्यांचा बाणा होता. सीमाचळवळीतील त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता.
अश्विनी ओगले-शब्दगंध
लोकमान्य ग्रंथालय हे त्यांचे अपत्य होते. एक झंझावती वादळ अचानक शमले, ही दुर्दैवाची बाब आहे.
शोभा लोकूर-मंथन
लोकमान्य ग्रंथालय हे त्यांनी सांस्कृतिक केंद्र बनवले व नवोदितांना वाचनासाठी प्रोत्साहित केले.
लत्ता कित्तूर-आर्टस सर्कल-रंगभूमी ग्रुप
सतत काहीतरी योजना आखून कार्यान्वित करण्यात ते मग्न असत. या दोन्ही संस्थांना त्यांनी नेहमीच सहकार्य केले.
माधुरी शानभाग-वसंत व्याख्यानमाला, शारदोत्सव सोसायटी
व्याख्यानमालेसाठी याळगी यांनी उत्तम वक्ते उपलब्ध करून दिले. निवृत्तीनंतर इतक्मया उपक्रमांची सुरुवात केले. त्यात सहभागी होण्यासाठी अनेकांना त्यांनी प्रेरित केले, हे उल्लेखनीय होय.
वीणा संत-इंदिरा संत कुटुंबीय
संत कुटुंब व याळगी यांचा घनि÷ संबंध होता. इंदिरा संतांच्या साहित्याबद्दल त्यांना कळकळ होती, आत्मियता होती व त्याच कळकळीतून ते अनेक कार्यक्रम आस्थापूर्वक करत. त्यांच्या कुटुंबीयांशी आमचा स्नेहबंध कायम राहील.
अनिरुद्ध ठुसे-शब्द
मी पुणेकरांचा बेळगावकर होण्यात याळगी कारणीभूत आहेत. नवखा असूनही माझ्या हस्ते त्यांनी दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मी सदैव कृतज्ञ आहे.
डॉ. संध्या देशपांडे-नाटय़ परिषद शाखा बेळगाव-नाटय़ांकुर
साहित्य चळवळ जागती ठेवण्याचा त्यांचा आदर्श घेण्याजोगा होता. ग्रंथालयाची चळवळ सक्रिय केली. वाङ्मय चर्चा मंडळाचे स्वरुप पूर्णतः बदलले. बेळगावच्या सर्व संस्था एकत्र येण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. जी.एं.चे दालन ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात साकारली.
जगदीश कुंटे-वरेरकर नाटय़संघ
नाटय़ संघाचे गतवैभव परत आणण्यासाठी ते धडपडत राहिले. संघाच्या कार्यात त्यांनी हिरीरिने भाग घेतला.
स्वरुपा इनामदार-सरस्वती वाचनालय
कोमसाप साहित्य संमेलन ठरवले तेंव्हा केवळ याळगांच्यामुळे आम्ही संमेलन यशस्वी केले. सरस्वती वाचनालयाच्या पुनउ&भारणी करताना त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता.
या व्यतिरिक्त विजय बोंगाळे-वि. गो. साठे प्रबोधिनी, अनिल पाटणेकर-वाङ्मय चर्चा मंडळ, शिवराज पाटील-पायोनिअर बँक, जायंट्स, अनिल चौधरी-रसिक रंजन, पंढरी परब-संचालक लोकमान्य सोसायटी, अशोक अलगोंडी, एकनाथ पाटील-बालिका आदर्श, रंजना कारेकर, नितीन कपिलेश्वरी, सुभाष ओऊळकर, विद्या वाचनालयातर्फे वसंत दांडेकर, सन्मित्र संघ कडोलीतर्फे मोहन पाटील, अंकिता कदम, दिलीप चव्हाण, जितेंद्र रेडकर, अजंठा फिल्म सोसायटीतर्फे पारिस बखेडी, मदन चौगुले, रंगसंपदातर्फे गुरुनाथ कुलकर्णी, अस्मिता आळतेकर यांनी आपले विचार व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनीही याळगी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
समारोप करताना ऍड. राम आपटे म्हणाले, हरहुन्नरी लोभ वाटावा अशी माणसे कमी होत आहेत. याळगी यांच्याप्रमाणे कार्यकर्ते निर्माण करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य ठरणार आहे.
साहित्यिकांतर्फे श्रद्धांजलीपर शोकसंदेश
जवळकर बंधू-नवसाहित्य बुक स्टॉल
अशोक याळगी गेल्याचे ऐकूण आम्हा जवळकर बंधूंना मनस्वी दु:ख होत आहे. कित्येक वर्षांपासून आमचे घनिष्ठ संबंध होते. आमच्या नवसाहित्य बुक स्टॉलला आल्यावर साहित्यविषयक आमच्या अनेक गप्पा होत. लोकमान्य ग्रंथालयाद्वारे तसेच मराठी पुस्तकांची विक्री त्यांनी साहित्यसेवा केली होती.
मधू मंगेश कर्णिक-
केवळ बेळगावच नव्हे तर साहित्य क्षेत्रातील आधार नाहीसा झाला आहे. मराठी भाषा साहित्य संस्कृती महाराष्ट्राभिमान व पत्रकारितेचा ते आदर्श होते. त्यांचे अकृत्रिम प्रेम आम्हाला लाभले, असा कार्यकर्ता लाभणे अशक्मय.
डॉ. तारा भवाळकर
ज्यांच्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक संस्कृतीची द्वारे खुली झाली, अनेक संस्थांना संजीवनी देणारे, घरगुती नात्याने जोडणारे याळगी गेल्याने माहेर तुटल्याची भावना आली आहे.
अरुणा ढेरे-
याळगी म्हणजे ऊर्जेचे, कार्यशक्तीचे सदासतेज असे ऊर्जा स्थान होते. त्यांचा बेधडकपणा, सच्चेपणाचा हात धरून असे. लोकमान्यमध्ये त्यांनी साहित्यिकांची दालने उभारली.
महेश केळूस्कर
बेळगावचे सांस्कृतिक चैतन्य असणाऱया याळगी यांनी मराठीचा जागर करण्याचा वसा घेतला होता. हे संदेश एस. पी. उपाध्ये यांनी वाचून दाखविले.
अमृत यार्दी-साहित्यिक धारवाड
वृक्ष कोसळतात तेंव्हा त्यावरील पाखरांची जशी केविलवाणी अवस्था होते तशी आमची अवस्था झाली आहे. वयाचे अंतर लीलया पार करून त्यांनी सर्वांशी तार जुळवली. लेखक, कार्यकर्ते, वक्ते यांना आपल्या गरुडपंखाखाली घेतले. यशस्वी आयोजन व त्यानंतरची आलिप्तता अशी अद्भूत कला त्यांच्या ठिकाणी होती.
संदीप खरे-कवी
अशोक याळगी म्हणजे अत्यंत रुजू व्यक्तिमत्त्व होते. माझ्या आजोबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बरेच साम्य होते. बेळगावला जाण्यामध्ये त्यांना भेटणे हे एक आकर्षण असायचे. ज्ये÷ पत्रकार परंतु तितकाच साधा, स्वच्छ विचारांचा व सर्वांवर प्रेम करणारा चिरतरुण माणूस म्हणून त्यांची ओळख राहिली. वयांनी ते ज्ये÷ होतेच. परंतु त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध राहिले हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
या संदेशाचे वाचन मनीषा सुभेदार यांनी केले.
रामदास फुटाणे-
याळगी म्हणजे बेळगावचे वैभव. मराठी भाषा व संस्कृती जोपासण्यासाठी ते झटले. महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांशी, कलाकारांशी त्यांचे प्रेमाचे ऋणानुबंध होते. हा संदेश जगदीश कुंटे यांनी वाचून दाखविला.
भरत गावडे-जायंट्स ग्रुप- यांनी कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. सूत्रसंचालन करून किशोर काकडे यांनी वीरवाणी आणि काकडे फौंडेशनतर्फे श्रद्धांजली अर्पण केली.