नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात याचिकांच्या सुनावणीसाठी न्यायाधीशांच्या खंडपीठाचे सोमवारपासून नवा रोस्टर लागू झाला आहे. विविध प्रकारच्या प्रकरणांसाठी न्यायालयाने विविध खंडपीठे निश्चित केली आहेत.
जनहित तसेच पत्र याचिकांवर सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायाधीश रामण्णा, चंद्रचूड, अशोक भूषण, नागेश राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश अनेक अन्य प्रकारच्या प्रकरणांच्या खंडपीठातही सामील असतील.
निवडणूक, सामाजिक न्यायाची प्रकरणे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर वर्ग होतील. न्यायालयीन अवमानाच्या प्रकरणांवर सरन्यायाधीश आणि न्यायाधीश यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करेल. धार्मिक आणि धर्मादायाशी संबंधित याचिकांवरील सुनावणी न्यायाधीश रामण्णा, ललित, डी.वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होईल. मध्यस्थी विषयक प्रकरणे सरन्याधीश, न्यायाधीश रमणा, आर.एफ. नरीमन, इंदू मल्होत्रा, इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाकडे सोपविण्यात येणार आहेत.