देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रतिक्रीया व्यक्त
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे आत्मनिर्भर, बलशाली भारत, भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प असे या अर्थ संकल्पाचे वर्णन करता येईल असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशातल्या सगळ्या घटनाकांना समावेश करून घेणारा समावेशी तसेच देशाला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प असेही म्हणता येणार. असेही फडणवीस म्हणाले.
पणजीतील भाजपच्या निवडणूक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांच्या सोब माजी खासदार नरेंद्र सावईकर, निरंजन डावखरे व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की महत्वाचे म्हणाजे करोनाच्या महासंकटाच्या काळातही 9.2 टक्के आर्थिक व्यवस्थेत वाढ करून जागात सर्वात वेगाने अर्थव्यवस्था वाढविणारी व्यवस्था भारत बनू शकतो हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे व बलशाली भारताचे प्रतिक आहे. असेही फडणवीस म्हणाले.
शेतकऱयांना समर्पित असाही हा अर्थसंकल्प असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला सक्षम करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाला आहे. शेतीसंदभातील मोठी गुंतवणूक म्हणजे आत्मनिभर भारत असेही फडणवीस म्हणाले. सहकार क्षेत्रालाही वेगळी दिशा देणारा तसेच इतर सर्व क्षेत्रातील घटनाकांना मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचेही फडणवीस म्हणाले.