वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रात स्थानापन्न असलेले पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार समाजाच्या सर्व घटकांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. ते येथे घटनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 1949 मध्ये 26 नोव्हेंबर या दिवशी भारताच्या घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. याच घटना समितीने भारताची राज्य घटना निर्माण केली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारत गणतंत्रीय राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे 26 जानेवारी हा दरवर्षी गणतंत्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अमित शहा यांनी आपल्या भाषणात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन केले.