वार्ताहर/ उचगाव
बेळगाव तालुक्मयामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 5 जुलैपासून दर रविवारी लॉकडाऊन घोषित केला. त्यानुसार सलग चौथ्या रविवारीही गावागावातून शुकशुकाट होता. मात्र, शेतकरीवर्गाला कोरोनापेक्षा पिकांना वेळेत कोरपणी महत्त्वाची असल्याने शेतकरी शेतावर कामात मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
राज्यासह जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णांनी धोक्मयाची सीमा ओलांडताना दिसून येत आहे. कोरोनाविरुद्ध लढणाऱया योद्धय़ांनाही कोरोनाची लागण होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत दर रविवारी लॉकडाऊन घोषित केला आहे. याला तालुक्मयातील सर्व व्यापारीवर्गाने चांगला प्रतिसाद दिला.
पिकांना कोरपण महत्त्वाची
ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाला शेतीचा हंगाम साधणे महत्त्वाचे असते. खरीप पिके ही पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने या काळात लागवड केलेल्या भात, बटाटा, भुईमूग, रताळी, नाचणा, मिरची, मका, जोंधळा, भाजीपाला या सर्व पिकांतून कोरपणी महत्त्वाची असल्याने कोरोनामुळे सर्व व्यवहार जरी बंद असले तरी शेतकऱयांना आपली शेतीची कामे बंद ठेवता येत नाहीत. वेळेत कोरपणी करणे महत्त्वाचे आहे.
पश्चिम भागातील हिंडलगा, उचगाव, तुरमुरी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, हंगरगा, बेळगुंदी, सोनोली, राकसकोप, गणेशपूर या संपूर्ण भागातील बसस्थानकावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याबरोबरच इतर सर्व व्यवसायही बंद होते. शेतीची कामे वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते.
रविवारी सुटीचा दिवस व लॉकडाऊन असल्यामुळे कामगारवर्ग पूर्णत: रिकामी असल्याने याचा उपयोग शेतीची कामे करण्यासाठी घरच्या मंडळींना झाला. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात होते.