रिकव्हरी रेट 80.11 टक्केंवर : आतापर्यंत 87 हजार 882 मृत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सलग तिसऱया दिवशी देशात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. त्या तुलनेत कोरोना आजारातून बाहेर पडणाऱयांची संख्या वाढल्यामुळे रिकव्हरी दरही 80 टक्केंच्या वर पोहचला आहे. कोरोनातून बरे होणाऱया लोकांची संख्या वाढू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या दोन-तीन दिवसातील कोरोना विषाणू संसर्गासंबंधीच्या आकडय़ांवरून देशात कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रित होण्याची शक्मयता आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकडय़ांनुसार सोमवारी देशात 86 हजार 961 नवे रुग्ण सापडले. तर, चोवीस तासात तब्बल 93 हजार 356 जणांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाख 87 हजार 580 झाला आहे. यापैकी 43 लाख 96 हजार 399 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 10 लाख 3 हजार 299 सक्रिय रुग्ण असून 87 हजार 882 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सोमवारी एका दिवसात 1,130 जणांचा मृत्यू झाला.
देशात सध्या अजूनही कोरोना विषाणूची प्रकरणे ज्या प्रमाणात येत आहेत ते कमी नाही. जगात कोणत्याही देशांमध्ये रोज समोर येणाऱया नव्या कोरोना रुग्णांच्या प्रकरणात भारत सर्वात पुढे आहे. मात्र, कोरोनाची नवी प्रकरणे ज्या संख्येत रोज येत आहेत, त्यापेक्षा जास्त लोक आता रोज बरे होत आहेत. मागील 24 तासात देशभरात 93 हजार 356 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकुण 43,96,399 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट 80.11 टक्के झाला आहे.
कोरोना व्हायरसने जीव गमावणाऱयांची संख्याही देशात त्याच पातळीवर आहे. दररोज सुमारे एक हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडय़ांनुसार 24 तासात 1133 लोकांनी देशभरात कोरोनामुळे जीव गमावला आहे.
रविवारी देशभरात विक्रमी 7.31 लाखपेक्षा जास्त कोरोना टेस्ट झाल्या आणि एकुण कोरोना व्हायरस चाचणीचा आकडा वाढून 6 कोटी 43 लाखांच्या पुढे गेला आहे. जगभरात अमेरिकेनंतर भारतातच सर्वात जास्त कोरोना चाचण्या होत आहेत. जागतिक स्तरावर कोरोना व्हायरस प्रकरणांबाबत बोलायचे तर जगभरात एकुण प्रकरणांचा आकडा वाढून 3.12 कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत जगात कोरोना व्हायरसमुळे 9.65 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, संपूर्ण जगात 2.28 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरसमधून बरे झाले आहेत.