नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचे थैमान सुरुच असून सलग तिसऱया दिवशी पंचवीस हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारपर्यंत गेल्या 24 तासांत देशभरात 28 हजार 637 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासात 551 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण गेल्या 24 तासात आढळले आहेत. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 लाख 49 हजार 553 एवढी झाली आहे. 5 लाख 34 हजार 621 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर 2 लाख 92 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात 551 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 22 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहचण्यासाठी 110 दिवस लागले होते. तर एक लाखांपासून आठ लाखांपर्यंत रुग्णसंख्या पोहचण्यासाठी 53 दिवस लागले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असूनही देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. सलग तिसऱया दिवशी 25 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर
देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत कोरोनाचे मोठय़ा प्रमाणात संक्रमण होत असून या राज्यात जास्त रुग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.78 टक्क्मयांवर पोहोचले आहे.
महाराष्ट्रात मृतांचा आकडा 10 हजार पार
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त झाली. गेल्या 24 तासात राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 8,139 कोरोनारुग्ण नोंदले गेले. राज्यात दिवसभरात 223 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 10 हजार 116 झाला आहे. टाळेबंदीसारखे कठोर उपाय योजूनही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.
महाराष्ट्र, दिल्लीत मृतांचा आकडा सर्वाधिक
देशात एका दिवसातील मृतांचा आकडा सध्या पाचशेच्या आसपास असल्याचे आकडेवारीतून दिसते. रविवारपर्यंत मागील 24 तासात 551 बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 223, तामिळनाडूतील 69, दिल्लीतील 34, पश्चिम बंगालमधील 26, उत्तर प्रदेशमधील 24, गुजरातमधील 10, कर्नाटकातील 70 जणांचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांपैकी महाराष्ट्रातील आकडा (10,116) सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली (3,334), गुजरात (2,032), तामिळनाडू (1,898), उत्तर प्रदेश (913), पश्चिम बंगाल (906), मध्यप्रदेश (644), कर्नाटक (613) आणि राजस्थान (503) या राज्यांचा क्रमांक लागतो.