वारकऱयांचा हिरमोड : विठुरायाच्या दर्शनालाही मुकणार : पालख्यांतून सहभागी होता येत नसल्याची खंत
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी आषाढी वारी (यात्रा) 20 जुलै रोजी आहे. या यात्रेसाठी विविध भागातून निघणाऱया पायी दिंडय़ांना सलग दुसऱयावर्षीही कोरोनाचा बेक लागला आहे. त्यामुळे बेळगाव परिसरातील वारकऱयांचा हिरमोड झाला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठी गर्दी होते. महाराष्ट्रासह देशभरातून जवळजवळ 15 लाखाहून अधिक भाविक एकवटतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या दहा पालख्यांना प्रत्येकी 40 वारकऱयांसह शासनाने परवानगी दिली आहे.
आषाढीवारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱयांना आस लागली आहे. शिवाय दरवषी शहरासह ग्रामीण भागातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यात्राकाळात पंढरपूरसह परिसरातील नऊ गावात नऊ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱयांना पंढरपूरच्या जवळही जाता येणार नाही. शिवाय दि. 18 ते 25 जुलै याकाळात वारकऱयांना चंद्रभागेत स्नान करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
दरवषी बेळगाव परिसरातून साधारण 20 ते 25 दिंडय़ा पंढरपूरला मार्गस्थ व्हायच्या. यापैकी काही दिंडय़ा 50 ते 60 वर्षांहून अखंडितपणे सुरू आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने दिंडय़ांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मागील वर्षापासून दिंडय़ांना बेक लागला आहे. कोरोना देशातून हद्दपार होऊ दे आणि पुढीलवषी दिंडय़ा सुरळीतपणे सुरू होऊ देत, असेच साकडे वारकरी मंडळींतून विठुरायाकडे घातले जात आहे. ग्रामीण भागातील अष्टे, सांबरा, निलजी, सुळगा, येळ्ळूर, मास्तमर्डी, कंग्राळी खुर्द, पिरनवाडी, बसवण कुडची, नावगे आदी गावांतून पारंपरिक पद्धतीने पायी दिंडय़ा जात होत्या. या दिंडय़ांतून 200 ते 250 वारकरी टाळ-मृदंगांसह स्वेच्छेने सहभागी व्हायचे. पण कोरोनामुळे सलग दुसऱयावषी दिंडय़ांना बेक लागल्याने दिंडी प्रमुखांसह वारकरी मंडळींतून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील दिंडय़ा भुतरामहट्टी, गोटूर, चिकोडी, अंकली, निपाणी, कागवाड, म्हैशाळ, कमलापूर, सीताराम महाराज मठ खर्डीमार्गे तर पूर्व भागातील दिंडय़ा गोकाक, मुडलगी, हारुगेरी, अथणी, जत, सांगोलामार्गे पंढरपुरात दाखल व्हायच्या. शिवाय अलीकडच्या काही वर्षात दिंडय़ांमध्ये सहभागी होणाऱया भक्तांची संख्यादेखील वाढली होती. आळंदीहून श्री ज्ञानेश्वर माउलीची तर देहूहून तुकाराम महाराजांची पालखी निघते. या मानाच्या पालखी सोहळय़ात बेळगाव परिसरातील शेकडो वारकरी सहभागी व्हायचे. मात्र, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून मानाच्या पालख्यांतूनदेखील सहभागी होत येत नसल्याची खंत वारकऱयांनी व्यक्त केली आहे.
दिंडीत खंड पडल्याने खंत
सांबरा-पंढरपूर अशी गेल्या 43 वर्षांपासून पायी दिंडी सुरू होती. मात्र, मागील वर्षापासून कोरोनामुळे दिंडीत खंड पडला आहे. या दिंडीत परिसरातील 50 गावचे भक्त सहभागी व्हायचे. शिवाय 500 हून अधिक वारकरी भक्तांचा सहभाग असायचा. त्यामुळे पायी दिंडीत आनंद-उत्सव भरून यायचा. मागील वर्षापासून दिंडीत खंड पडल्याने खंत वाटत आहे.
-यल्लाप्पा गिरमल महाराज दिंडी प्रमुख, सांबरा