प्रतिनिधी/ वाई
सलोनी तोडकरी-चिरंजीव संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ह्यांचे बाल अधिकारांना घेऊन तिसरे तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण.
चिरंजीवी संघटनेच्या बचपन बचाओ, मानवता बचाओ या मोहिमेला दोन वर्ष पुर्ण झाले. अजूनही सरकारने हवा तसा प्रतिसाद चिरंजीव संघटनेच्या मागण्यांना दिलेला नाही त्यामुळे उपोषणात सातत्य आहे.
24 डिसेंबर पासून उपोषणाची सुरुवात दिशा अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष डॉ नितीन कदम सर यांच्या हस्ते झाली त्याचबरोबर छात्रशक्ती संस्थेच्या सचिव व चिरंजीवी संघटनेच्या पालक स्मिता ताई साळुंखे तसेच तारांगण मैत्रकुल चे प्रमुख संचालक जितेश दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, त्याचबरोबर लहान मुलीच्या हातातल्या बांगडय़ा , मंगळसूत्र काढून आणि बालमजुराच्या हातातून कामाचे साहित्य काढून बालकांच्या प्रश्नांची भिंत तोडून त्यांना पुस्तक देऊन शिक्षण का महत्वाचं हा संदेश देऊन एक आगळ वेगळं उद्घाटन करण्यात आले. असे संघटनेचे राज्य प्रवक्ता पुष्कर धुरी ह्यांनी सांगितले.
उपोषणाला पाठिंबा म्हणून संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह राहुल भाट, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल बनसोडे, राज्य सोशल मीडिया प्रमुख संदीप बनसोडे, राज्य सदस्य प्रगती कांबळे, राज्य सदस्य गंगा सागर गुंडेया , राष्ट्रीय संघटक चेतन कांबळे, राज्य कार्यवाह ऐश्वर्या तोडकरी, राज्य सहसंघटक हर्ष तेलुरे, राज्य सचिव भार्गव पाटील, राज्य संघटक सागर वाघ ह्यांनी देखील एक दिवसीय उपोषण केले. असे संघटनेचे राज्य कार्यवाह ऐश्वर्या तोडकरी यांनी सांगितले.
मराठी भारती, विदयार्थी भारती, भाकर फाउंडेशन, हमदम, वजीर, जिविका, आणि श्रमजीवी संघटना इत्यादी संघटनांनी उपोषणाला पाठिंबा पत्र दिले असे कार्यक्रम प्रमुख नेहा भोसले यांनी सांगितले