जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांच्या हस्ते गोळय़ा वाटपाचा शुभारंभ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱया ‘अर्सेनिक अल्बम 30’ या होमिओपॅथिक गोळय़ांचे वाटप जिल्हय़ातील सव्वा दोन लाख कुटुंबांना करण्यात येणार आहे. या गोळय़ा वाटपाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
जिल्हय़ातील सर्व नागरिकांसह कोरोना लढय़ामध्ये आघाडीवर सेवा बजावणाऱया सर्व अधिकारी व कर्मचारी यांना या गोळय़ांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, महसूल अधिकारी व कर्मचारी यांना या गोळय़ा दिल्या जाणार आहेत. या गोळय़ा 12 वर्षांवरील सर्वांनी महिन्यातून तीन दिवस उपाशी पोटी तीन गोळय़ा घ्यायच्या आहेत. तर बारा वर्षांच्या आतील मुलांनी दोन गोळय़ा तीन दिवस या प्रमाणे तीन महिने घ्यायच्या आहेत. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर काही आजार असणाऱया रुग्णांनाही या गोळय़ा घेता येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
आमदार वैभव नाईक म्हणाले, सध्या पावसाळा सुरू असून त्यामुळे तापाच्या रुग्णांची संख्या जिल्हय़ात वाढत आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागांमध्ये कॅम्पचे आयोजन करावे व तापाच्या रुग्णांची तपासणी करावी, अशा सूचना दिल्या. सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर लोक तापाचा आजार लपवतात. पावसामध्ये शेतीत काम करताना लोक भिजल्यामुळे त्यांना ताप येतो. पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. जनतेचे आरोग्य धोक्मयात येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणांनी अशा प्रकराचे कॅम्प घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्व शासकीय यंत्रणांनी प्रत्येक कुटुंबाला या गोळय़ा पोहोचतील, असे नियोजन करावे व जनतेने आरोग्य यंत्रणेच्या सूचनांप्रमाणे या गोळय़ांचे सेवन करावे, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.