खानापूर / प्रतिनिधी
हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे, या उपक्रमाला उस्फुर्त असा प्रतिसाद समाजातील दानशूर व्यक्तींनी दिला आहे आणि त्यानुसार आपल्या दिनविशेषाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य युवा समितीकडे सुपूर्द केले आहे आणि अजूनही करत आहेत.
तेच साहित्य गरजू विध्यार्थ्यांना आता युवा समिती कडून वितरित करण्यात येत आहे याची सुरवात खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आली.
खानापूर तालुक्यातील चिखली आणि आमगाव या गावातील विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष धनंजय पाटील,उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, किरण हुद्दार, चिखली शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुरेश सुतार, गणेश घाडी, अर्जुन गावडे आमगाव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.