देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रवेशानंतर करोना महामारीचा वेग अचानक सहापट वेगाने वाढत आहे. 29 डिसेंबर रोजी देशात नऊ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. आठ दिवसानंतर हा आकडा 58 हजारांवर पोहोचला, तर गुरुवारी तो 90 हजारांवर पोहोचला होता. महाराष्ट्र, बंगाल, दिल्ली, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, झारखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये संसर्गात वेगाने वाढ होत असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी घोषित केले होते. सहापट गतीने वाढणाऱया या धोक्मयाची लक्षणे मात्र सौम्य असल्याचा दिलासाही आहे. या रोगाने गेली दोन वर्षे देशाला अक्षरशः हैराण केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये मिळालेल्या दिलाशामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असतानाच पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागल्याने आणि त्याची सहापट गती असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यापूर्वीचे निर्णय देशाची अर्थगती कमी करणारे ठरले असल्याने यावेळी निर्णय घेताना सरकार जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक पाऊल टाकू लागले आहे. याच काळात मुंबईसारख्या महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलेली रोखठोक मते सर्वसामान्यांना अधिक दिलासा देऊन जातील. चहल यांनी सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असे स्पष्ट केलं आहे. मुंबईत गुरुवारी एका दिवसात 20 हजारच्या वर केसेस झाल्या. त्यापैकी फक्त 110 लोक ऑक्सिजन बेडवर गेले. 1180 लोक रुग्णालयात दाखल झाले. 35 हजार पैकी फक्त 5999 बेड भरले आहेत. 84 टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे. बेड रिकामे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही, असे चहल म्हणाले आहेत. पहिल्या आणि दुसऱया लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटीचे होते. पण आत्ता मुंबईतले 186 रुग्णालय, 35 हजार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे तिसऱया लाटेचे निकष बदलून पॉझिटिव्हीटी ऐवजी पहिला निकष म्हणजे रुग्णालयात किती बेड रिकामे आहेत आणि दुसरा निकष म्हणजे ऑक्सिजनचा वापर किती होतोय असे करावेत, आता आकडय़ांचं महत्त्व राहिलेलं नाही असं चहल यांनी मुख्यमंत्री आणि तज्ञांच्या उपस्थितीतील बैठकीत मत मांडले आहे.
रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर निर्बंधांचा विचार व्हावा. रुग्णसंख्या कमी-जास्त होत असेल, तर त्याचा फरक पडत नाही. शुक्रवारी 20 हजार 400 रुग्णसंख्या झाली आहे. काल 64 हजार चाचण्या केल्या होत्या, आज 72 हजार चाचण्या केल्या आहेत. पण आता आकडय़ांवर आधारीत लॉकडाऊन होऊ शकत नाही. 21 डिसेंबरला आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरूवात झाली. 16 दिवसांत मृत्यूचा एकूण आकडा 19 आहे. म्हणजे सरासरी दिवसाला एक मृत्यू आहे. आपल्याकडे रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे, पण मृत्यू सरासरी एकच आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही. अशी भूमिका आयुक्त चहल यांनी मांडली आहे. मुंबई लोकलमधून रोज 60 लाख लोक प्रवास करत आहेत. सगळे दुहेरी लस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही. पुढे जे काही होईल, त्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. आणि सर्व यंत्रणांचं सध्या अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही असेच मत पडले आहे. मुंबई एक जागतिक दर्जाचे महानगर आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाच्या प्रमुखावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडते. धारावी सारखी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी ज्या महानगराच्या अखत्यारीत येते, तिथे पसरलेली साथ नियंत्रणात आणण्यासाठी चहल यांनी केलेले कार्य लक्षात घेतले तर ते सध्या काय भूमिका मांडत आहेत त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. या विषयावर काम करत असणाऱया सक्रीय मंडळींच्या एकत्रित विचाराचा तो परिपाक आहे. चहल हे फक्त त्या चमूचे प्रमुख म्हणून बोलत आहेत. हा एका दृष्टीने दिलासा देखील आहे आणि त्याच वेळी प्रत्येक जिह्यात आणि शहरांमध्ये काम करणाऱया प्रशासकीय अधिकाऱयांनी आपल्या पातळीवर किती जबाबदारीने काम केले पाहिजे याचे हे एक अनोखे उदाहरण आहे.
मुंबई महापालिका परिसरात असणारी गर्दी आणि माणसाला खेटून उभा राहणारा माणूस अशी तेथे असणारी परिस्थिती लक्षात घेतली तर, या आव्हानाला कसे सामोरे जायचे हे ते अधिक जबाबदारीने सांगू शकतात. ओमिक्रॉनच्या साथीत रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढणार हे मान्य करूनच यंत्रणांना काम करावे लागणार होते. यादृष्टीने विचार केला असता,वाढती आकडेवारी आणि प्रत्यक्ष ऑक्सिजनची लागणारी गरज किंवा मृत्यूचा आकडा यांच्या बाबतीत अधिक सजगपणे काम करणे अपेक्षित होते. मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यादृष्टीने जी भूमिका मांडत आहेत ती योग्यच आहे. दोन लस पूर्ण झालेल्यांची नागरिकांना लोकलमधून प्रवासाची संधी असल्यामुळे कोरोनाचा प्रसार किंवा धोका या बाबतीत सध्या तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही हे त्यांचे म्हणणे योग्य आहे. मात्र तरीही जागतिक पातळीवर तज्ञांनी या लसीचा उपयुक्तता कालावधी सहा महिनेच असल्याचे म्हटले आहे. त्यादृष्टीने याकडे अधिक सजगपणे पाहणेही आवश्यकच आहे.
कोणत्याही एकाच गटाच्या अंदाज किंवा अनुमानावर अवलंबून राहून आणि हे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारला भूमिका घेता येणार नाही हे निश्चित. मात्र चहल यांच्या वक्तव्यातून किमान भीतीच्या वातावरणातून दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. दोन लाटांमध्ये सरसकट लॉकडाउन लावणे हा एकच पर्याय मानला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बाबतीत अती आग्रही आहेत असाही आरोप झाला. मात्र त्यामुळे महाराष्ट्र अपेक्षेपेक्षा लवकर या परिस्थितीतून सावरू शकला. तिसऱया लाटेला सामोरे जाताना आपण अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहोत हे सध्याच्या परिस्थितीतून लक्षात येत आहे. कोरोना सह जगण्याचे आव्हान पेलायचे होते. त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे, असे निश्चित मानता येईल. इतका दिलासा या रुग्ण वाढीच्या काळातही मिळाला आहे.
Previous Articleआंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन
Next Article टीव्हीएसच्या तांत्रिक सल्लागारपदी विश्वनाथन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.