प्रतिनिधी / सांगरुळ
सांगरुळ ता. करवीर येथे दरवर्षी श्री ज्योतिर्लिंग नवरात्र उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. पण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलीनुसार श्री ज्योतिर्लिंग नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. पालखी सोहळाही सुतार कुंभार समाजातील मानकरी व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळून साजरा होत आहे.
सांगरुळच्या ज्योतिबा देवालयाच्या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये केलेले असून मंदिरावरील इतर कृत्रिम रंग दूर करून मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे काम नवरात्र उत्सव मंडळाने मार्च महिन्यापासून हाती घेतले असून हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याबद्दल नवरात्रोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांचे राजस्थान मधून व श्री ज्योतिर्लिंग भक्तांच्या मधून कौतुक होत आहे. दरवर्षी पहिल्या माळीपासून भक्त उपवास धरून मंदिरांमध्ये नऊ दिवस वास्तव्यास असतात. ज्योतिर्लिंग जागरा दिवशी ही संख्या पाच शे-सहाशेच्या आसपास होत असते. पण चालूवर्षी ग्रामपंचायतीने घरातूनच उपवास धरून मंदिराकडे गर्दी न करता नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायतीच्या आव्हानाचे ग्रामस्थांनी व नवरात्रौत्सव भक्त मंडळानेही काटेकोर पालन केले आहे. मंदिरामध्ये नेहमी धार्मिक विधी नवरात्र उत्सव भक्त मंडळाच्या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पाडली जात आहेत.
या पालखी सोहळ्यात मानकरी कैलास सुतार नामदेव कुंभार, अमर सुतार तानाजी कुंभार, पोलीस पाटील बाजीराव खाडे इत्यादींचा सहभाग असतो