सलग दुसऱया दिवशीही कारवाईचा धडाकाः विनाकारण फिरणाऱयांची वाहने जप्त ः दंड आणि फौजदारीची कारवाई सुरू
प्रतिनिधी/सांगली
जिल्हÎात कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा कहर जिल्हÎात वाढतच चालला आहे. पण याची फिकीर अनेक सांगलीकरांना नाही, त्यांनी या लॉकडाऊनचे नियम मोडण्याचा जणू निर्धारच केला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी आता थेट रस्त्यावर उतरत आपल्या `ऍक्शन मोडचा एपिसोड’ बुधवारी सांगलीकरांना चांगलाच दाखविला. आणि विनाकारण फिरणाऱयांची वाहने जप्त करत त्यांच्यावर दंडाची कारवाई केली आहे. याशिवाय शहरातील विविध उपनगरातही पोलीसांच्याकडून संचलन करण्यात आले आहे.
विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱयांवर अटकाव करण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शहरासह उपनगरात चालत जात चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. चौकाचौकात टोळके करुन बसणाऱया टोळक्यांनाही पोलिसांच्या काठीचा त्यांनी `प्रसाद’ देत ही गर्दी हटविली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांचीही त्यांनी चांगलीच हजेरी घेतली. निम्मे शहर पायी चालत घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर आल्याने दुपारनंतर संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली.
कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. गुरुवारपासून महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यूही लागू केला आहे. यापार्श्वभूमीवर गेडाम यांनी कालपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी विश्रामबाग चौकात नाकाबंदी करण्यात आली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांना थेट पोलीस ठाण्यांची वारी घडविण्यात आली. अलिशान चारचाकीसह शंभरावर वाहने जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले.
बुधवारी अकराच्या सुमारास अधीक्षक गेडाम फौजफाटÎासह शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आले. शहरातील मच्छी मार्केट परिसरात घुसून सारी दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बदाम चौकसह परिसरातील उपनगरात विनाकारण गर्दी करून बसणाऱया टोळक्यांनाही पोलिसी खाक्या दाखवत हुस्कावून लावण्यात आले. पोलिसांनी अक्षरशः पाठलाग करत टोळक्यांनी हुसकावले. त्यानंतर स्टेशन चौक, गणेश मार्केट परिसरात नाकाबंदी करण्यात आली. त्याठिकाणी काही व्यवसायिकांनीही बंद करण्याच्या सूचना देत विनाकारण रस्त्यावर थांबू नका, असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस कमिटी, पंचमुखी मारूती रस्ता, हिराबाग कॉर्नर, शिवाजी मंडई, मारूती चौक, तरुण भारत स्टेडियम चौक परिसरात अधीक्षकांनी संचलन करत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. यावेळी दुचाकीवरून फिरणायांना अटकाव करत कारवाईही केली. दुपारी साडेबारानंतर सारा परिसर शांत झाला. मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्तेही ओस पडले होते. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून आले.