प्रतिनिधी / सांगली
शांतिनिकेतन लोकविद्यापीठमध्ये ले.जन.एस.पी.पी. थोरात अॅकॅडमीच्या वतीने यंदाही झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
निसर्ग हाच आपला खरा रक्षक आहे याची जाणीव ठेवून अॅकॅडमीच्या वतीने दरवर्षी झाडांना राखी बांधण्यात येते. शांतिनिकेतन परिसर हा अनेक जातींच्या वृक्षवेलींनी बहरलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती अकॅडमीच्या इन्चार्ज समिता पाटील यांनी दिली.
कार्यक्रमास उपसंचालक डी. एस. माने, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती लाभली. यावेळी अकॅडेमीतील सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधून “रक्षाबंधन” हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय बामणे यांनी केले.