मुंबई \ ऑनलाईन टीम
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पैशांसाठी मृत रुग्णाला जिवंत असल्याचं दाखवून एका डॉक्टरने दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार करण्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात इस्लामपूर येथे घडली आहे. राज्यकर्तेच खंडणीखोर असेल, तर कोणाला कशाला भीती वाटेल. पैशाने राज्यकर्तेच विकत घेतले की सगळे प्रकरण मूळापासून मिटवता येईल, एव्हढा साधा हिशोब समाजकंटक करत आहेत, अशी टीका भातखळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
मृत रुग्ण जिवंत असल्याचे दाखवून इस्लापूर येथील डॉ. वाठारकर याने मृतदेहावरच दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारणी वाठारकरला पोलिसांनी अटक केली आहे. अतुल भातखळकर यांनी या घटनेचा दाखला देत ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.