नवे 393 रूग्ण वाढलेः मनपा क्षेत्रात 63, ग्रामीण भागात 330ः जिल्हयातील 19 जणांचे मृत्यू
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील आजअखेर 30 हजार 506 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शनिवारी नवीन 393 रूग्ण वाढले तर 689 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील 19 जणांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. आजअखेर 1403 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रूग्णसंख्या 38 हजार 518 झाली आहे.
मनपा क्षेत्रात अवघे 63 रूग्ण वाढले
सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात शनिवारी अत्यंत दिलासा देणारी गोष्ट घडली असून मनपा क्षेत्रात एका दिवसांत 100 पेक्षा कमी संख्येने अनेक दिवसानंतर रूग्ण आढळून आले आहेत. शनिवारी अवघे 63 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 34 आणि मिरज शहरात 29 रूग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही शहरात आता हळूहळू रूग्णसंख्या कमी होत चालली आहे. मनपा क्षेत्रात आजअखेर 14 हजार 947 रूग्ण संख्या झाली आहे. यातील जवळपास 82 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 330 नवे रूग्ण वाढले
शनिवारी ग्रामीण भागात नवीन 330 रूग्ण वाढले आहेत. सध्या ग्रामीण भागात रॅपीड ऍण्टीजन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढलेले दिसून येत आहे. वाढलेली रूग्णसंख्या तालुकानिहाय अशी आटपाडी 20, जत तालुका 23, कडेगाव तालुका 33 आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 31 नवीन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 35, मिरज तालुक्यात 31 तर पलूस तालुक्यात 16 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 29, तासगाव तालुक्यात 42 तर वाळवा तालुक्यात जिल्हÎात सर्वाधिक असे 70 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 19 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना 19 जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगली शहरातील एकाचा, मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यातील दोघांचा, कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा उपचारारदरम्यान मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील दोघांचा, मिरज ग्रामीण भागातील एकाचा तर पलूस तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील दोघांचा आणि वाळवा तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. असा एकूण जिल्हÎातील 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 1403 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
परजिल्ह्यातील 14 रूग्ण वाढले
जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातील रूग्णांच्यावरही जिल्ह्यात मोठया संख्येने उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी 14 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्Îामुळे परजिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या 1220 झाली आहे. त्यातील 875 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 165 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. शनिवारी नवीन 14 रूग्ण वाढले त्यामध्ये कोल्हापूरचे सहा, बेळगावचा एक, सातारा येथील दोन, सोलापूर येथील दोन आणि पुणे येथील तीन रूग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत परजिल्ह्यातील 180 रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
तीन हजार 299 स्वॅब तपासले
जिल्ह्यात शनिवारी तीन हजार 299 स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये आरटीपीसी मध्ये एक हजार 120 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये दोन हजार 179 जणांचे स्वॅब तपासले. या दोन्ही तपासण्यामध्ये नवीन 393 रूग्ण आढळून आले आहेत.
30 हजार 506 जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्हÎात शनिवारी 689 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हÎातील 30 हजार 506 रूग्णांनी आजअखेर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎातील 30 हजार रूग्णांनी यशस्वी मात केल्याने जिल्हÎाला हा दिलासा मिळाला आहे. गेल्या सलग 15 दिवसांपासून जिल्हÎात वाढणाऱया रूग्णापेक्षा कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हÎातील कोरोना रिकव्हरी रेट आता 80 टक्केच्या जवळपास जावून पोहचला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या
नवीन रूग्ण 393
उपचाराखालील रूग्ण 6609
बरे झालेले रूग्ण 30506
आजअखेर मृत्यू 1403
एकूण रूग्ण 38518