प्रतिनिधी / सांगली
जिल्हÎात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. जिल्हÎात शनिवारी आणि रविवार मिळून नवे 2665 रूग्ण वाढले तर दोन दिवसांत जिल्हÎात मृत्यूचे तांडव वाढतच चालले आहे. या दोन दिवसांत 82 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 494 तर ग्रामीण भागात तब्बल 2171 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 2136 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात 13 हजार 595 रूग्ण आहेत..
महापालिका क्षेत्रात 494 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 494 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात शनिवारी 131 रविवारी 167 तर मिरज शहरात शनिवारी 77 तर रविवारी 119 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 23 हजार 60 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 72 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 2171 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रविवारी आटपाडी तालुक्यात 168 तर कडेगाव तालुक्यात 43 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 162 तर पलूस तालुक्यात 56 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 71 तर जत तालुक्यात 87 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 95, मिरज तालुक्यात 200 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 32 तर वाळवा तालुक्यात 138 रूग्ण वाढले आहेत. शनिवारी ग्रामीण भागात 1119 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये पाच तालुक्यात 100 ते 150 रूग्णसंख्या वाढली आहे.
दोन दिवसांत 82 जणांचा मृत्यू
जिल्हÎात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांत 82 जणांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये रविवारी 46 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सांगली शहरात चार मिरज शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी, तासगाव शिराळा या तालुक्यात प्रत्येकी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यात सहा तर पलूस तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात सात तर वाळवा तालुक्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात चार, जत तालुक्यात तिघांचा आणि कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 2136 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्हÎात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 2136 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात 78 हजार 343 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 62 हजार 400 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज लसीकरण होणार नाही
जिल्हÎात लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने सोमवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे. जिल्हÎात आजअखेर साडेपाच लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. शासनाकडून लस प्राप्त झाल्यावरच लसीकरण होणार आहे.
नवे रूग्ण 2665
उपचारात 13595
बरे झालेले 62400
एकूण 78343
मृत्यू 2348
शनिवार आणि रविवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 214
कडेगाव 153
खानापूर 288
पलूस 119
तासगाव 225
जत 249
कवठेमहांकाळ 198
मिरज 358
शिराळा 111
वाळवा 226
सांगली शहर 298
मिरज शहर 196
एकूण 2665
आजचे लसीकरण 1233
एकूण लसीकरण 563922