सांगली / प्रतिनिधी
रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 154 रुग्ण वाढले, तर 225 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या उपचारात दोन हजार 52 रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील कोरोना आता आटोक्यात येऊ लागला आहे. महापालिका श्रेत्रात नवीन 40 रुग्ण वाढले त्यामध्ये सांगली शहरात 30 तर मिरज शहरात 10 रुग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात 114 रुग्ण वाढले. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 10, जत तालुक्यात 23, कडेगाव मध्ये 14, कवठेमहांकाळ मध्ये 05 रुग्ण वाढले. खानापूर 17, मिरज तालुक्यात 11, पलूस मध्ये तीन रुग्ण आढळून आले.
शिराळा येथे आठ तर वाळवा येथे दोन वाढले तासगाव तालुक्यात 21 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सांगली शहर,मिरज तालुका,कवठेमहांकाळ, शिराळा येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.