प्रतिनिधी / सांगली
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेली संचारबंदी सुरू असली तरी नव्या निर्बंधांमध्ये फळ विक्रेत्यांना शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. सध्या सांगलीत विविध प्रकारच्या फळांची मोठी आवक झाली आहे.
पण गेल्या दोन दिवसांपासून संचारबंदीमुळे पोलिसांकडून होत असलेल्या कडक कारवाईमुळे रस्त्यावरील गर्दी हळूहळू कमी होताना असे चित्र दिसत आहे. पर्यायाने फळ विक्रेत्यांचा दिवसभर थांबूनही अपेक्षित व्यवसाय होत नसल्याचे दिसून येते. सध्या सांगलीच्या बाजारपेठेत डाळींब, चिक्कू, सफरचंद, केळी, कलिंगड यांची मोठी आवक झालेली आहे. पण संचारबंदी मुळे फळ विक्रेत्यांनी विष्णुअण्णा फळ मार्केट मध्ये आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठेत तुलनेने आंबा विक्रीचे स्टॉल कमी दिसत आहेत. 1मे नंतर सांगलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीस येईल असे फळ विक्रेत्याकडून सांगण्यात आले.