टँकरने पाणीपुरवठा; नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा
सांगली : प्रतिनिधी
शहरातील शामरावनगरसह परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरात परिसरात पाणीच आलेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेसमोर आंदोलन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.
दळवी म्हणाले, शहरातील शामरावनगरसह परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. नागरिकाना बारमाही दलदलीचा सामना करावा लागत आहे. नागरी सुविधा मिळत नाहीत. रस्ते मोठ्या प्रमाणात खराब आहेत. अस्वच्छ मूखंडामुळे डासांसह झुडपांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिक अक्षरश: नरकयातना भोगत आहेत अशा परिस्थितीत आता पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शागरावनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, गॉर्डन कॉलनी, फिरदीस कॉलनी, जनता कॉलनीसह परिसरात गेल्या आठवडाभरापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
महापालिका प्रशासन व नगरसेवकांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे सांगत दळवी म्हणाले, महापालिका नागरिकांच्या मुंडक्यावर बसून विविध कर वसूल करते. मात्र नागरी सुविधा देण्याची वेळ येते तेव्हा हात आखडता घेतला जातो आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. मात्र तो पुरेसा नाही. येत्या दोन दिवसांत परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करु, असा इशारा दळवी यांनी दिला. यावेळी युनूस बेलिफ, रफिक शेख, वसीग सनदी, अक्रम शेख, अख्तर अत्तार, संभाजी भोसले, विठ्ठल वाघमारे आदी उपस्थित होते.