जिल्ह्यातील 11 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 113 वाढलेः ग्रामीण भागात 384 रूग्ण वाढलेः29 हजार रूग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात नवीन 497 रूग्ण वाढले. तर दिवसभरात 685 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 11 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण जिल्हÎात 1384 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. तर जिल्ह्यात आजअखेर 29 हजार 817 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
महापालिका क्षेत्रात 113 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात 113 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 65 तर मिरज शहरात 48 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या हळू हळू कमी होत चालली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. मनपा क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 14 हजार 884 झाली आहे.
ग्रामीण भागात 384 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात नवीन 384 रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 25, जत तालुक्यात 17, कडेगाव तालुक्यात 50 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 23, खानापूर तालुक्यात 47, मिरज तालुक्यात 56 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 15, शिराळा तालुक्यात 16, तासगाव तालुक्यात 49 आणि वाळवा तालुक्यात 86 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 11 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील 11 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील एकाचा, शिराळा तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील एकाच आणि वाळवा तालुक्यातील तीन जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हÎातील एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजअखेर 1384 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील नवीन तीन रूग्ण दाखल
परजिल्ह्यातील नवीन तीन रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचा एक, मुंबईचा एक आणि पुणे येथील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 180 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. परजिल्ह्यातील 1206 जणांच्यावर जिल्हÎात उपचार करण्यात आले त्यामध्ये 857 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 169 जणांच्यावर उपचार सुरू आहेत.
29 हजार जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्ह्यात शुक्रवारी 685 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 29 हजार 817 झाली आहे. जवळपास 76 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच सलग 13 दिवस कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हÎाला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे. त्यामुळे ही अत्यंत चांगली गोष्ट घडत चालली आहे.
3062 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात शुक्रवारी तीन हजार 60 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील एक हजार 24 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये दोन हजार 38 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 497 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 38125
बरे झालेले 29817
उपचारात 6924
मयत 1384