नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
प्रतिनिधी / सांगली
शहरात गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात पाळीव प्राण्यांचे ही समावेश होत असल्याचे दृश्य अहिल्यानगर चौक ते यशवंत नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसून येत आहे.
त्या रस्त्यावर जवळपास तीस ते पस्तीस कुत्र्यांचा झुंड असतो. कारण की अहिल्यानगर चौकात व शहरात चायनीज पदार्थ विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या गाड्यावरती शिल्लक असलेले मांसाहारी पदार्थ ते रस्त्यावर टाकले जाते. त्यामुळे त्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या व दुर्गंधी वाढली आहे.
तसेच त्या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या मोकाट कुत्र्यावर महापालिकेने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे अहिल्यानगरमधील नागरिकांकडून मागणी होत आहे.