आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी नगरपंचायतची अधिसूचना निघून पुन्हाती रद्द करून ग्रामपंचायतच अस्तित्वात ठेऊन अन्याय केला आहे. त्यामुळे तात्काळ आटपाडीची तात्काळ नगरपालिका करावी, अशी मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील यांनी केली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत कार्यवाहीची ग्वाही दिली.
पालकम जयंत पाटील यांची भेट घेऊन भारत पाटील यांनी आटपाडी नगरपालिका करण्याबाबत निवेदन दिले. नवनाथ साळुंखे, गणेश जाधव, प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत आटपाडी नगरपालिका प्रश्न मांडून भारत पाटील यांनी तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली. आटपाडीला विकासापासून वंचीत ठेवण्यासाठी राजकीय कुरघोडी करून नगरपंचायतची अधिसूचना निघून ही ग्रामपंचायत कायम ठेवण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप भारत पाटील यांनी केला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.