प्रतिनिधी/सांगली
वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ आहे. आज, शुक्रवारी सकाळी सांगलीमध्ये आयर्विन ब्रिज जवळ पाण्याची पातळी तेवीस फुटावर होती. गुरुवारी रात्री उशिरा पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती जवळपास 24 फुटा पर्यंत गेली होती. पण शुक्रवारी सकाळी पाणीपातळीत सहा इंचाने घट झाल्याचे सांगण्यात आले यामुळे पाणी पातळी स्थिर आहे.
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी कोयनेतून पाणी सोडण्यात येत नाही त्यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी स्थिर आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत पाणी पातळी साडेतेवीस फुटापर्यंत पर्यंत होती अशी माहिती महापालिका आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली.