प्रतिनिधी / नांद्रे
अन्याय निमूलन समिती मिरज तालुका अध्यक्षा स्नेहल जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सामान्य जनता हालाकीचे जीवन जगत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लहान लहान व्यवसाय मोडकळीस आले आहेत त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने माणसी पाच हजार रूपयांची तात्काळ मदत द्यावी. तसेच लोकांच्या कर्जाची वसूली थांबवण्यात यावी, जिल्हा प्रशासनाने कोरोना बाबतचे नियम घालून लहान लहान व्यवसाय व उद्योग सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्याची मुभा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले.
यावेळी सांगली जिल्हा अध्यक्षा आशाताई पवार, सांगली शहर अध्यक्ष असिफ मुलाणी, मिरज तालुका अध्यक्षा स्नेहल जाधव, पद्मावती गोलकर, हसन मुजावर, बेबी मुशरीफ आदी मान्यवर उपस्थित होते.