सांगली : प्रतिनिधी
कॉलेज कॉर्नर येथे दरवर्षी प्रमाणे संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना देखील श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सचिव तेजस सन्मुख म्हणाले की, आज सर्वसामान्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तो संविधानामुळेच आहे. नागरिकांना दर्जाची व संधीची समानता राज्यघटनेने दिली असून बाबासाहेबांनी मांडलेली ही तत्वे आपण अंगीकार करायला हवीत. माणूस ही संकल्पना खऱ्या अर्थाने संविधानामुळेच पूर्ण झाली आहे.
यावेळी अक्षय उर्फ रोहीत कोठावळे, प्रा.सचिन पाटील सर, प्रा.लक्ष्मण मोरे सर, प्रा.पंकज पाटील सर, राहूल कांबळे, अनिकेत कलगुटगी,सुयोग कोले, शिवाजी चलवादी, ऋषिकेश शिंदे, सुरज नाईक, सौरभ कलगुटगी, संतोष कांबळे, सचिन नाईक, आरमन मुलाणी, महेश जाधव, आभिषेक मासाल, गणेश उभाळे, शाईश कांबळे,राजन लांडगे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.