चार टक्के रूग्ण होम आयसोलेशनमध्येः मृत्यूचे प्रमाण 3.68 टक्केः 90 टक्के रूग्ण कोरोनामुक्त
सांगली / विनायक जाधव
जिल्ह्यात कोरोनाचा कहर अत्यंत कमी झाला आहे. ही जिल्हÎासाठी आनंदवार्ता आहे. जिल्हÎात आजअखेर 42 हजार 858 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 38 हजार 545 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हÎात उपचारात अवघे दोन हजार 737 रूग्ण आहेत. यातील फक्त 818 म्हणजेच एकूण रूग्णांच्या फक्त दोन टक्के रूग्ण हे रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तर एकूण रूग्णाच्या चार टक्के रूग्ण म्हणजेच एक हजार 919 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही जिल्हÎाला दिलासा देणारी गोष्ट आहे.
कोरोनामुक्तीसाठी ऑक्टोबर महिना लाभदायक
जिल्हÎात कोरोना रूग्णवाढीचा वेग अत्यंत कमी झाल्यानंतर कोरोनामुक्तीचा वेग मात्र वाढला आहे. हा कोरोनामुक्तीचा वेग वाढल्याने आजअखेर जिल्हÎात 90 टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीसाठी ऑक्टोबर महिना लाभदायक ठरला आहे. या महिन्यात जवळपास 30 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. वेळेवर उपचार आणि वेळेवर अनेक रूग्णांचे कोरोनाचे निदान झाल्याने त्यांना वेळीच बाजूला काढल्याने हा कोरोना आटोक्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग कमी झाला. त्यामध्येच कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या झपाटÎाने वाढली त्यामुळे जिल्हÎात रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली. सध्याच्या घडीला जिल्हÎात 90 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. फक्त सहा टक्के रूग्ण उपचारात आहेत. या सहा टक्केमधील दोन टक्के रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात मृत्यू दर 3.68 टक्के
जिल्ह्यात आजअखेर 42 हजार 858 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एक हजार 576 रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हÎातील कोरोनाचा मृत्यू दर हा 3.68 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर कमी आणण्यासाठी मोठÎाप्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. हा मृत्यू दर एकवेळेस सव्वाचार टक्के इतका झाला होता. तेथून तो कमी होवून आता 3.68 टक्के इतका झाला आहे. जिल्हÎात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात मृत्यू दर वाढला होता. तो ऑक्टोबर महिन्यात कमी झाला आहे. हा मृत्यूदर आणखीन कमी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
1919 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये
जिल्ह्यात सध्या एक हजार 919 रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रूग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. या एक हजार 919 रूग्णांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. त्यामुळे त्याचा उपचाराचा दहा दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते ठणठणीत बरे होणार आहेत.
3500 हजार बेड रिकामे
जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णवाढीचा दर घटला आहे. त्यामुळे जिल्हÎात कोरोना केअर सेंटरमधील बेड रिकामे झाले आहेत. जवळपास साडेतीन हजार बेड जिल्हÎात रिकामे आहेत. जिल्हÎात एकूण चार हजार 622 कोरोनाचे बेड आहेत. त्यामध्ये 322 बेड हे व्हेंटिलेंटरचे आहेत. तर दोन हजार 386 बेड हे ऑक्जिनचे आहेत. व एक हजार 914 बेड हे जनरल बेड आहेत. सध्या 818 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 67 रूग्ण हे व्हेंटिलेंटर वर आहेत. तर 372 रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. असे एकूण 439 रूग्णांची प्रकृती नाजूक आहे. तर उर्वरित 379 रूग्ण हे जनरल बेडवर आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि जनरल बेड मिळून साडेतीन हजार बेड रिकामे आहेत.
कोरोनाकडे अद्यापही दुर्लक्ष करू नकाः डॉ. संजय साळुंखे
जिल्ह्यात जरी कोरोना आटोक्यात आला असला तरीसुध्दा नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व सोशल डिन्स्टीसिंगचे पालन केलेच पाहिजे. तरच जिल्हा संपूर्णपणे कोरोनामुक्त होवू शकतो. सध्याच्या घडीला जरी 90 टक्के कोरोना रूग्ण बरे झाले असले तरी जिल्हÎावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. दसरा आणि दिवाळी सारखे दोन मोठे सण समोर आहेत. या कालावधीत लोकांनी थोडे जरी दुर्लक्ष केले तरी त्याचा विपरित परिणाम दिसून येवू शकतो त्यामुळे कोरोनाकडे कोणीही दुर्लक्ष करू नका असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. तसेच जिल्हÎातील एकही कोरोना सेंटर अधिकृतरित्या बंद करण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दवाखान्यात ऍडमिट असणारे रूग्ण 818
होम आयसोलेशनमध्ये असणारे रूग्ण 1919
एकूण उपचारातील रूग्ण 2737