जिल्हय़ातील 25 तर परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू ः मनपा क्षेत्रात 161 रूग्ण वाढलेः ग्रामीण भागात 90 रूग्ण वाढलेः274 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी/सांगली
सोमवारी जिल्हय़ात नवे 251 रूग्ण वाढले तर त्यापेक्षा अधिक 274 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र उपचार सुरू असताना उच्चांकी 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 25 जण जिल्हय़ातील आहेत तर एकजण परजिल्हय़ातील आहे. आजअखेर जिल्हय़ात 345 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण पाच हजार रूग्ण झाले
महापालिका क्षेत्रात सोमवारी 161 रूग्ण वाढल्याने एकूण रूग्णसंख्या पाच हजाराच्या पार गेली आहे. रविवारी महापालिका क्षेत्राला प्रथमच दिलासा मिळाला होता. फक्त 69 रूग्ण वाढले होते. पण सोमवारी मात्र पुन्हा एकदा 161 नवीन रूग्ण वाढले आहेत. यातील सांगलीत 87 आणि मिरजेत 74 रूग्ण वाढले आहेत. जिल्हा परिषदेमधील तिघां कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आजअखेर जिल्हापरिषदेतील 49 कर्मचारी कोरोनाने बाधित आढळुन आले आहेत. aमहापालिकेकडून मोठय़ाप्रमाणात रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रात ही टेस्ट करण्यात येत आहे. यामध्ये मोठय़ा संख्येने कोरोना रूग्ण आढळून येत चालले आहेत. सांगली शहरात वाढलेले रूग्ण हे सांगली-मिरज रोडवरील गांधी वसतीगृह, मार्केट यार्ड, खणभाग, गावभाग, विश्रामबाग, हनुमाननगर, शंभरफुटी, हरीपूर रोड, बायपास रोड तसेच संजयनगर या परिसरातील आहेत. तर मिरज शहरात 74 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये गावठाणमधील काही व उपनगरातील काही रूग्ण आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात आजअखेर पाच हजार 126 रूग्ण झाले आहेत.
ग्रामीण भागात 90 रूग्ण वाढले
ग्रामीण भागातही सोमवारी मोठयाप्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. सोमवारी 90 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी शहरात चार, खरसुंडी, यपाचीवाडी, तडवळे, दिघंची येथे प्रत्येकी एक तर गवळेवाडी येथे चार रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात सोहोली आणि आसद येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. कवठेमहांकाळ शहर, पिंपळवाडी, देशिंग, येथे प्रत्येकी दोन, रांजणी येथे तीन, हिंगणगाव, कोगनोळी, नागेवाडी, अलकूड एस येथे प्रत्येकी रूग्ण वाढला. खानापूर तालुक्यात विटा येथे एक आणि चिखलहोळ येथे चार रूग्ण आढळून आले आहेत. मिरज तालुक्यात धामणी येथे तीन, बुधगाव, समडोळी, सुभाषनगर येथे प्रत्येकी एक तर म्हैशाळ,माधवनगर, समडोळी, येथे प्रत्येकी दोन रूग्ण वाढले आहेत. तर पलूस तालुक्यात दुधोंडी येथे दोन भिलवडी आणि माळवाडी येथे प्रत्येकी एक नवीन रूग्ण आढळला. शिराळा तालुक्यात बिळाशी, आरळा, खिरवडे, येथे प्रत्येकी एक तर शिराळा येथे दोन रूग्ण आढळून आले आहेत. तासगाव शहरात सहा वायफळे येथे दोन, मणेराजुरी येथे तीन आणि सावळज येथे सहा रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा येथे तीन, शिगाव येथे दोन, इस्लामपूर येथे पाच रेठरेहरणाश, मसुचीवाडी आणि कामेरी येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. जत येथे एक रूग्ण वाढला.
जिल्हय़ातील 25 जणांचा मृत्यू
जिल्हय़ात सोमवारी 25 जणांचा कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 55, 60, 62, आणि 66 वर्षीय महिलांचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. 54, 53 आणि 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 43, 57 आणि 60 वर्षीय व्यक्तीचा खासगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील चार व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिरजेतील 43 वर्षीय महिलेचा आणि 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला तर 59 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटल येथे तर 45 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुपवाड येथील 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला.
तासगाव-दहिवडी येथील 36 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पलूस-कुंडल येथील 75 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. खानापूर-घोटी येथील 53 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात, कवठेमहांकाळ येथील 64 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे, वाळवा-कुरळप येथील 28 वर्षीय युवकाचा सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विटा येथील 68 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय विटा येथे, तासगाव-डोंगरसोनी येथील 69 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे तर इस्लामपूर येथील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. जिल्हय़ात सोमवारी उच्चांकी तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याने आजअखेर जिल्हय़ातील 345 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्हय़ात उपचार सुरू असणाऱया कोल्हापूर जिल्हय़ातील नरसोबावाडी येथील 55 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. त्यामुळे परजिल्हय़ातील आजअखेर 87 जणांचा मृत्यू झाला आहे.
विक्रमी 274 जण कोरोनामुक्त
रविवारप्रमाणेच सोमवारीही जिल्हय़ात नवीन कोरोना रूग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. जिल्हय़ात सोमवारी 274 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात आजअखेर पाच हजार 314 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुक्त रूग्णांची वाढलेली संख्या जिल्हय़ाला दिलासा देणारी गोष्ट ठरत चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 8694
बरे झालेले 5314
उपचारात 3035
मयत 345