जत,आटपाडी, विटा,कडेगाव, कराड,या शहरांचे तुटलेले दळण वळण पुन्हा सुरू
कडेगाव / प्रतिनिधी :
कडेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात पडेल्य मुसळधार पावसाने येरळा नदीला मोठा पूर आल्याने हणमंतवडिये (ता .कडेगाव ) येथील विजापूर – गुहागर महामार्गावरील असणाऱ्या पुलाचा बहुतांश भाग वाहून गेल्याने पूल खचला होता.आठवडाभर वाहतूक बंदच होती. त्त्यांमुळे सध्या वाहतुकीचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होतो.दररोज गुहागर विजापूर हा मार्गच पुर्णपणे बंदच होता या मार्गावरील वाहतूक इतर ठिकाणाहून सुरू होती. कडेगाव तालुक्यात गेल्या वर्षापासून विजापूर – गुहागर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे . त्यांमुळे या महामार्गावरील असणारे पूर्वीचे धोकादायक पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात आलेले आहेत . हणमंतवडिये येथील येरळा नदीवरील पूलही ब्रिटीशकालीन असल्याने तो पूर्णता धोकादायक बनला होता . त्यांमुळे येथे पूर्वीचा असणारा पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामास गेल्या काही दिवसापासून सुरुवात करण्यात आली आहे .त्यांमुळे वाहतुकीसाठी या ठिकाणी नदीवर पाईप व मुरुम टाकून दुसरा रस्ता तयार करण्यात आला आहे . परंतु मुसळधार पावसाने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या ठिकाणचा पुलाचा बहुतांश भाग पाण्याने वाहून गेला आहे . त्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल निर्माण झाले आहे . प्रवाशांना सध्या नेवरी ,खेराडे -विट , चिखली कडेपूर या मार्गाने दहा ते पंधरा किलोमीटर फिरून लांबून जाऊ लागत आहे . मुसळधार पावसाने तालुक्यातील अमरापूर , शिवणी , हणमंतवडिये कडेगाव , आंबेगाव , येतगाव नेवरी यासह अन्य गावातील ओढे , बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत .यामुळे नदिच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
मात्र लोकांची होणारी मोठी कसरत पाहता प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी ठेकेदार देसाई आणि कंपनी यांना तातडीने भराव करून रस्ता पुर्ववत करा अशी.मागणी केली व काम पुर्ण होईपर्यंत त्याचा वळोवेळी आढावा घेतला तसेत.तालुक्यातील पत्रकार यांनी बातम्याव्दारे पाठपुरावा केल्याने हा तालुक्यातील मुख्य गुहागर ते विजापूर रस्ता मंगळवारपासून सुरू झाला आहे.