कृषी व सहकार राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांचे आवाहन
प्रतिनिधी / कडेगाव
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरू झाल्या असून आपण त्याचा विचार न करता काळजी घेऊन या संकटातून बाहेर पडू मतदार संघातील लोकांना आरोग्य सेवा व उपचार सुविधा पुरविण्यासाठी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने लागेल ती मदत केली जाईल, लोकांनी घाबरून न जाता धैर्याने या परिस्थितीचा मुकाबला करूया असे आवाहन राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
कडेगाव येथे भारती हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर च्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड-१९ डेडीकेटेड सेंटरच्या उदघाटन समारंभा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, भारती विद्यापीठाचे मानद व्यवस्थापक डॉ.एच.एम.कदम, युवक नेते डॉ.जितेश कदम, भारती हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज चे डीन डॉ.शहाजी देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव इंद्रजीत साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सध्या कोरोनाचा आलेख जरी कमी आला असला तरी, लोकांनी गांभिर्याने घेतले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मास्क, सोशल डिस्टिंगचे पालन व बेसिक नियमांच्या पालनासह, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बाबत चर्चा सुरू झाल्या असून आपण त्याचा विचार न करता काळजी घेऊन या संकटातून बाहेर पडू असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर्सनी उपचार पद्धती समजून सांगावी अश्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी स्वागत व प्रास्ताविक भारती हॉस्पिटलचे डीन डॉ.शहाजी देशमुख यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, युवक नेते हिम्मत देशमुख, नगरसेवक सागर सूर्यवंशी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मालन मोहिते, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. आभार डॉ.मिनाक्षी सावंत यांनी मानले.