आमदार पडळकरांनी पून्हा केले शरद पवारांना लक्ष
प्रतिनिधी / सांगली
ज्या पक्षाचे चार खासदार आहेत. त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदार असलेल्या नरेंद्र मोदींना काय म्हणायला हवं असा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवाडीचे। अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी हे टग्यांचे सरकार आहे. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला, कामगारांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
पुणे पदवीधर मतदार संघातील भापज आणि मित्र पक्षांचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित भाजप नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले ही निवडणूक विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या सरकार विरोधात आहे. महाराष्ट्रच्या जनतेने भाजपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेनं विश्वासघात केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी जहरी टीका केली. ज्या पक्षाचे चार खासदार आहेत. त्यांना तुम्ही लोकनेता म्हणता. मग ३०३ खासदार असलेल्या नरेंद्र मोदी यांना काय म्हंटले पाहिजे असा सवाल उपस्थित करत पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी हे टग्यांचे सरकार आहे. आ. पडळकर म्हणाले की, ज्या पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा जयंत पाटील यांच्या खांद्यावर आहे त्याच निवडणुकीच्या मतदारयादीत त्यांचे नाव नाही. त्यावरुन त्यांची तयारी दिसून येते.