जत / प्रतिनिधी
तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी पार पडली ,या निवडणुकीत अधीकचा कौल काँग्रेसकडे असला तरी मोठ्या गावांनी दणका दिला आहे, त्यामुळे काँग्रेसने हा पहिल्या टप्प्यातील इशारा वेळीच ओळखण्याची गरज आहे, सोमवारी 30 पैकी 29 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, जतेत आमदार विक्रमदादा सावंत यांच्या विरुद्ध माजी आमदार विलासराव जगताप यांच्याच गटात प्रमुख लढती झाल्या, राष्ट्रवादीने काही ठिकाणी उमेदवार तर काही गावात पैनेल उभे केले होते, या निकालानंतर काँग्रेसने 16 ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे, तर भाजपने 14 ग्रामपंचायत वर दावा ठोकला आहे, राष्ट्रवादीने 32 सदस्य आणि तीन ग्रामपंचायतीत सत्तेत असल्याचा दावा केला, जनसुराज्यने तीन ग्रामपंचायत मधये आमचे उमेदवार विजयी झाल्याचे म्हटले आहे
दरम्यान, आठ गावात स्थानिक आघड्यानी यश मिळवले आहे, शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला आहे, रासपनेही खाते खोलले आहे, या निवडणुकीतील लक्षवेधी बाब म्हणजे काँग्रेसने उटगी, उमराणी, शेगाव, सनमडी, तिकोंडी, अंकले, गुडापूर अशा ग्रामपंचायती गमावल्या आहेत,