गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा जिल्हा बँकेचा आदेश
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील अग्रगण्य जयहिंद मालगांव विकास सोसायटीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. बोगस कर्जमाफी, वसूलीतील तफावत, थकबाकीदार कर्जदारांना देण्यात आलेली दाखले, बेकायदेशीर कर्ज वाटप अशा अनेक कारणांवरुन संस्था चालकांसह सचिवांना जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.डब्ल्यू.कडू यांनी नोटीस बजावली आहे.
जबाबदारांकडून गैव्यवहाराची रक्कम वसूल करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. संस्था सभासद सदानंद कबाडगे आणि इतर सहा जणांनी याबाबत तक्रार केली होती.