मनसेत खळबळ ; वयक्तिक कारण; मन सैनिक म्हणून काम करणार
प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी आज तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे जिल्हा मनसेत खळबळ माजली आहे. दरम्यान वयक्तिक कारणास्तव राजीनामे दिले असून यापुढे मन सैनिक म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती टेंगले यांनी दिली.
जिल्हा मनसेचे इंजिन आता कुठे रुळावर येण्यास सुरुवात झाली होती. शहरासह ग्रामीण भागात मनसेची ताकद वाढू लागली होती. कार्यकर्त्यांची फळी निर्माण होत होती. दरम्यान राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये संदीप टेंगले (जिल्हा उपाध्यक्ष), आशिष कोरी (जिल्हा सचिव), विनय पाटील (महापालिका विधानसभा क्षेत्र अध्यक्ष), दयानंद मलपे (सांगली शहराध्यक्ष) व सागर चव्हाण (कुपवाड शहर अध्यक्ष) यांचा समावेश आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनमास्त्रामुळे बाळसे धरू लागलेल्या मनसेला धक्का बसला आहे.