प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे गुरूवारच्या रात्री पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे रात्रभर नदीकाठची गावच्या-गावं रातोरात मोकळी होऊ लागली आहेत.
सांगली जिल्हा Live अपडेट..
- सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत 25 रस्ते पाण्याखाली
●अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवून अडीचलाख क्युसेस
अलमट्टी धरणाचा विसर्ग अडीच लाख क्युसेस करणेतआला .सकाळी दहा पासून तो दोन लाख क्युसेस होता. महाराष्ट्र शासनाने तो वाढवा अशी विनंती केली होती. या पाश्वमूमीवर दुपारी विसर्ग वाढवून अडीच लाख करण्यात आला.
●कोयना, महाबळेश्वर परिसरात पाऊस किंचीत मंदावला
कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे, मिरज तालुक्यातील डिग्रज मध्ये स्थलांतरास सुरवात
कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज यांना जोडणारा बंधारा आणि नवीन पूल दोन्हीही पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला
Video कोयना धरणाचे दरवाजे उघडले
Video सांगलीतील पुरस्थिती, जलसंपदामंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन
सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- वाळवा तालुक्यातील बोरगाव बंधारा व ताकारी पुल, बहे बांधारा पाण्याखाली गेले आहेत त्याचबरोबर नदीकाठची असणारी गावे खरातवाडी, हुबालवाडी, फार्णेवाडी, बनेवाडी, गौडवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून या गावातील लोकांनी गुरुवार रात्रीपासून स्थलांतर करण्यास सुरुवात केली
- अलमट्टी धरण शुक्रवार 23 जुलै सकाळी दहा वाजता विसर्ग दोन लाख क्युसेकने सुरू
- सांगलीला महापूराचा धोका पाणी पातळी 50 होणार कोयनेतून मोठा विसर्ग