इस्लामपूर / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज वाळवा गावातील द्राक्ष बागायतदार यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या बागांची पाहणी जलसंपदा व पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.
यावेळी पाटील म्हणाले , सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्षबागा अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनास यापूर्वीच दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.