एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द, इतर मार्गावरुन वाहतूक, रेल्वे वाहतूकही वळवली
प्रतिनिधी / सांगली
सांगलीला जोडणारे अनेक मार्ग सध्या पाण्याखाली गेल्याने सांगलीकरांचा अनेक गावांशी संपर्क तुटलेला आहे. फक्त बकाही ठराविक मार्गच चालू असल्याने नागरिकांना इतर मार्गावरून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अनेक एसटी मार्गही बंद ठेवण्यात आल्याचे एसटीच्या सांगली विभागातून सांगण्यात आले.
इस्लामपूर ते वारणानगर मार्गावर ऐतवडे पूल पाण्याखाली गेल्याने तो मार्ग सध्या बंद आहे. तसेच मांगले पुलावरील पाण्यामुळे इस्लामपूर ते करंजवडे, जूनेखेड पूलावरील पाण्यामुळे इस्लामपूर ते जुनेखेड हा मार्ग बंद आहे. सोंडोली पुलावरील मार्ग बंद असल्याने शिराळा ते कांडवण वाहतूक ठप्प आहे. तसेच काडे पूलावरील पाण्यामुळे शिराळा कोडोली एसटी मार्ग बंद आहे. आमणापूर पुलावरील पाण्यामुळे सांगली ते आमणापूर व पलूस ते आमणापूर एसटी मार्ग बंद आहे. पलूससाठी मात्र माधवनगर मार्गे वाहतुक सुरु आहे. तसेच मौजे डिग्रज मार्ग बंद झाला आहे व भिलवडी पुलावरील पाण्यामुळे सांगली ते भिलवडी मार्गही बंद झाला आहे. कसबे डिग्रज, समडोळी, कवठे पिरान, तुंग, आष्टा, इस्लामपूर, पुणे कोल्हापूर या मागावरील सर्व फेऱ्या रद कारणार आहेत, तर इचलकरंजी वाहतूक मात्र सुरू असल्याने तिकडील फेऱ्या चालू आहेत.
तसेच बायपास रस्त्यावरील पाण्यामुळे इस्तामपूर मार्ग बंद आहे तर सांगली ते कुरुंदवाड मार्ग फक्त नृसिंहवाडीपर्यंत सुरु आहे. शिरोली पुलावारील पाण्यामुळे सांगली ते कोल्हापूर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु होती. पण आता ती सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. शाळगाव पुलावरील पाण्यामुळे कडेगाव रायगाव वाहतक बंद आहे. तडसर पुलावरील वाहतूक बंद असल्याने कडेगाव ते इस्लामपूर एसटी मार्ग बंद आहे. नेर्ली पूल पाण्याखाली गेल्याने कडेगाव अपशिंगे मार्ग बंद आहे.
रेल्वे सेवा ही विस्कळीत
कोल्हापूर मिरची कडून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी कोयना या दोन महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही कुर्डुवाडी मार्गे वळविण्यात आली आहे. सांगली-मिरज-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.