एक जूनपासून सांगली जिल्ह्यात सकाळी सात ते अकरा किराणा दुकान, दूध, बेकरी, भाजीपाला राहणार सुरू
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. सध्या सुरू असलेल्या निर्बंधांची एक जूनला मुदत संपणार असल्याने त्यानंतर शिथिलता देण्यात आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यानंतर सांगली जिल्ह्याच्या निर्बंधामध्ये शिथिलता आली असून जिल्ह्यामध्ये एक जूनपासून सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक मधील किराणा दुकाने, भाजीपाला, चिकन, अंडी, मटण, दूध ,बेकरी आदी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली जिल्ह्यामध्ये आठवडी बाजार बंदच राहणार असून हॉटेल बिअर बार, रेस्टॉरंट यांना घरपोच सेवा देण्यास मात्र परवानगी असल्याचे सांगण्यात आले.