ऑगस्ट 2019 पूर्वीचे सभासद होणार मतदानासाठी पात्र
प्रतिनिधी/सांगली
राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांची रणधुमाळी सुरु होणार असताना पहिल्या टप्प्यात होणाऱया 72 सहकारी संस्थांच्या मतदार याद्या पुन्हा सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. नव्या आदेशानुसार 30 ऑगस्ट 2019 पूर्वी झालेल्या नवीन सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदार याद्या प्राप्त झाल्यानंतर प्रारुप यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नव्याने मतदार याद्या तयार होणार आहेत. त्यामुळे 72 संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम ऑक्टोबरच्या पंधरवडÎात लागण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका गेली जवळपास दीड वर्ष राज्य शासनाने वारंवार लांबणीवर टाकली होती. फेब्वारी 2021 मध्ये राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. गत आठवडÎात शासनाने सहकारी संस्थांमधील निवडणुकांवरील स्थगिती उठवत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्या सहकारी संस्थांची अर्ज विक्री सुरु होती, त्यांच्या निवडणुका तात्काळ होतील. परंतू ज्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्या संस्थांकडून नव्याने प्रारुप मतदार यादी मागविण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार 30 ऑगस्ट 2019 पूर्वी जे नवे सभासद झालेले आहेत. त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांकडून नव्याने प्रारुप याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात 31 डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 1528 सहकारी संस्था आहेत. जिल्हा बॅँक, पलूस व जत अर्बन बॅक तसेच विकास सोसायटÎा, दूध संस्था, खरेदी विक्री संस्था व अन्य सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक विभागीय सहनिबंधकांच्या अखत्यारित आहे, तर अन्य संस्थांची निवडणूक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होणार आहे. `क’ व `ड’ वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया तालुका उपनिबंधकांच्या अखत्यारीत होणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अ वर्गातील 72 सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. या संस्थांकडून मतदार यादी नव्याने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रारुप मतदार यादी प्राप्त झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून हरकती, सुनावणी आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी आहे. अंतिम मतदार यादीनंतर निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला जाईल. निवडणुकीसाठी अर्ज विक्री, अर्ज स्वीकारणे, उमेदवारी माघार, अंतिम उमदेवार निश्चिती, प्रचारासह प्रत्यक्ष मतदानाच्या कार्यक्रमासाठी 35 दिवसांचा कालावधी लागतो.